आपत्ती व्यवस्थापन ते फॉर्च्युन ५०० कंपनी
२४ जुलै १९८९ या दिवशी मुसळधार पावसाने आणि १००/१५० किमी. वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याने मुंबई ते कोकणाला अक्षरशः झोडपून काढले होते; ज्यात कित्येक लोकं मृत्युमुखी देखील पडले होते. नवी मुंबईतील अनेक केमिकल कंपन्या असणाऱ्या पाताळगंगा परिसरात देखील रात्रभर ८/१० तास सतत पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होऊन संपूर्ण विभाग पाण्याखाली गेला होता. पाताळगंगेतील त्या शंभरेक […]