औदार्याला मर्यादा असणे आवश्यक आहे...
जर तुमच्या औदार्याला सीमा नसेल तर लोकांना त्याचे मोल कळत नाही, किंबहुना ते औदार्य दिसतही नाही.
जेव्हा पहिल्यांदा माझ्या मनात हा विचार आला, तेव्हा तो तात्विक वाटला नाही; तो वैयक्तिक वाटला.
कारण मला त्यात स्वतःचेच प्रतिबिंब दिसले होते.
अनेकदा लोकांना काहीना काहीतरी मुक्तहस्ते देत असताना, मदत करत असताना, त्यांच्याशी जुळवून घेत असताना एखाद्या जाणीवेने मी स्वतःलाच थांबवले आहे आणि मनातल्या मनात विचार केला आहे, "मी इथे माझ्या स्वतःच्या मर्यादा तर ओलांडत नाही ना?"
असे नाही की मला द्यायचे नसते, पण काही गोष्टी मी कठीण अनुभवातून शिकलो आहे:
कोणतीही गोष्ट अमर्यादपणे, कोणत्याही स्वरूपाशिवाय दिली गेली, तर हळूहळू तिचे मूल्य कमी होते.
ही जाणीव केवळ तत्वज्ञान किंवा सिद्धांत नाही तर अनुभवातून आलेले शहाणपण आहे.
आणि तुमचे त्या मोक्याच्या क्षणी सजग होणे हे त्या अनुभवातून मिळवलेल्या शहाणपणाचे लक्षण आहे. आणि तेच जास्त महत्वाचं असतं. नाहीतर वेळ गेल्यावर आलेले शहाणपण काहीही कामाचे नसते.
अनेकदा, कुणालातरी मदत करत असताना अचानकपणे माझ्या मनात विचार येतो:
थांब... मी इथे माझी स्वतःची मर्यादा ओलांडत आहे का?
रागातून नाही.
निराशेच्या गर्तेत पण नव्हे
तर फक्त एक जाणीव.
आणि मी त्या क्षणाचा आदर करायला शिकलो आहे.
कारण मला आणखी एक गोष्ट माहित आहे, जी मान्य करणे थोडी अवघड आहे...
कोणतीही गोष्ट अगदी सहजपणे, खूप वेळा दिली गेली, तर हळूहळू तिचे मूल्य कमी होते.
कारण लोकं वाईट असतात असे नाही,
कारण लोकं कृतघ्न आहेत असे नाही.
किंवा त्यांना पर्वा नाही असेही नाही.
बहुतेक लोकं तसे नसतात.
कदाचित आपली जडणघडणच तशी झाली आहे
खरेतर मानवी मन मूल्यांचे निर्धारण कसे करते, याबद्दल हे आहे.
पण वस्तुस्थिती अशी आहे की, मूल्य हे मानसशास्त्रीयदृष्ट्या मर्यादांशी जोडलेले असते.
माझ्या कार्यशाळा आणि वैयक्तिक कोचिंग सत्रांदरम्यान, मी पाहिले आहे की लोकं सशुल्क वेळेकडे एका वेगळ्याच दृष्टीकोनातून पाहतात.
तिथे नियोजित संवादांचा आदर कसा केला जातो हे पाहणे चित्तवेधक असते.
त्याचबरोबरीने स्पष्ट संरचना असलेले संभाषण लोकं ज्या प्रमाणे अतिशय गांभीर्याने घेतात ते पाहणे देखील तेवढेच आश्चर्यकारक.
आणि याच्या अगदी उलट दुसरी मानसिकता म्हणजे...
जेव्हा वेळ, पैसा किंवा मदत कोणत्याही मोबदल्याशिवाय आणि मर्यादेशिवाय, कोणत्याही ठोस रचनेशिवाय किंवा स्वरूपाशिवाय दिले जातात, तेव्हा मन शांतपणे त्याला 'ऐच्छिक' किंवा 'अनावश्यक' या श्रेणीत टाकते.
कोणीही हेतुपुरस्सर असं करत नाही.
ते जाणीवपूर्वक नाही तर अजाणतेपणी, पण आपोआप घडते.
जसे हवा... आपल्याला तिची नितांत गरज असते, पण ती मिळेनाशी होईपर्यंत आपण क्वचितच तिच्याकडे लक्ष देतो.
म्हणूनच सशुल्क सत्रांचा आदर केला जातो.
नियोजित वेळेचा सन्मान केला जातो.
स्पष्ट नियमांचे पालन केले जाते.
आणि म्हणूनच, अमर्याद औदार्य, कितीही शुद्ध असले तरीही, अनेकदा गृहीत धरले जाते.
त्यात भावनांची कमतरता असते म्हणून नव्हे तर त्यात सीमारेषा आखलेल्या नसतात म्हणून.
काही वेळा, मनात चाललेल्या विचारांना सजगतेने पाहताना जाणवते...
हे फक्त त्यांच्याबद्दल नाही तर हे मानसशास्त्र आहे.
मर्याद आणि अमर्याद मध्ये एक पातळशी ओळ जाते ज्याची नोंद सहसा कुणीही घेत नाही त्यामुळे मर्यादा नसलेला उदारपणा एखाद्याच्या आयुष्याच्या पार्श्वभूमीत सहजच नाहीसा होतो.
पण मर्यादा निर्धारित केलेला उदारपणा?
तो नक्कीच परिणाम साधतो.
मर्यादा नसलेला उदारपणा म्हणजे काठ किंवा किनारा नसलेल्या नदीसारखा असतो.
काठांशिवाय, ती एका दिशेने न वाहता सर्वत्र पसरते आणि तो संपूर्ण प्रदेश दलदलीने भरून जातो.
पाणी तिथेच असते.
भरपूर असते.
पण ते कशालाही खोलवर पोषण देत नाही.
काठांमुळे, त्याच नदीला दिशा, गती आणि जीवन मिळते.
केवळ त्या रूपकानेच मी जे काही देतो त्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला.
आणि मग दुसरा एक विचार येतो, जो मनाला दिलासा देणारा असतो:
मर्यादा घातल्याने मी कमी दयाळू होत नाही.
तर त्या मर्यादा निश्चित केल्याने लोकांना माझा दयाळूपणा दिसतो.
त्यामुळे त्याला योग्य ते महत्त्व मिळते.
असे काही क्षण येतात जेव्हा मला म्हणावेसे वाटते,
“ठीक आहे... काही हरकत नाही... कधीही.”
आणि कधीकधी तेच योग्य असते.
पण आता, क्षणभर थांबून मी स्वतःला शांतपणे विचारतो:
जर मी हे आत्ता दिले, तर त्यामुळे माझ्या बद्दलचा आणि प्रक्रियेबद्दलचा आदर वाढेल... की कमी होईल?
जर त्यामुळे आदर वाढत असेल, तर मी संकोच न करता देतो.
जर त्यामुळे आदर कमी होत असेल, तर मी स्पष्टीकरण देत नाही, मी फक्त मागे हटतो किंवा दिशा बदलतो.
त्या एका क्षणातील थांबण्याने दुसऱ्या कुणालाही न जाणवणाऱ्या परंतु माझ्याच मनातल्या मनात वर्षानुवर्षे धुमसत राहणाऱ्या, स्वतःबद्दलच्या रागापासून मी स्वतःलाच वाचवले आहे.
कारण ती नाराजी उदारतेतून येत नाही.
ती मनाविरुद्ध केलेल्या उदारतेतून येते.
मी स्वतःशी बोलण्याची पद्धतही बदलली आहे...
'मी हे केले पाहिजे' असा विचार करण्याऐवजी,
मी स्वतःला आठवण करून देतो:
ही एक जाणीवपूर्वक दिलेली भेट आहे, बंधन नाही.
आणि अशी भेटवस्तू किती वेळा द्यायची याच्या मर्यादा मी ठरवतो.
कारण भेटवस्तू तेव्हाच मौल्यवान आणि अर्थपूर्ण वाटतात जेव्हा त्याचे मोल समोरच्याला कळलेले असते आणि ते देताना आपण कोणत्याही बंधनाखाली नसतो आणि ते देणे आपण मनःपूर्वक निवडलेले असते...
आणि त्या भेटवस्तूंची अपेक्षा केली जात नाही किंवा त्या प्रत्येक वेळी दिल्या जात नाहीत.
त्यात एक चमत्कारिक मनशांती आणि संतुलनाची भावना असते.
आणि हेही तितकेच खरे की, मला या बाबतीत कठोर होण्याची गरज नाही.
मला माझ्या मनाचे दरवाजे बंद करण्याची देखील गरज नाही.
मला शांतपणे मर्यादा पाळण्याची गरज आहे.
आणि बहुतेक वेळा, माझ्या लक्षात येते...
मी ते करणे आधीच सुरु केले आहे.

Very nice blog
Thanks a lot for taking time to appreciate
Khup chhan bhavna darshavli ahe ani satya paristhiti ahe ki loka fayda ani tota evdhyach bhavnene devan ghevan kartat mag ti madat kuthlyahi swarupat aso ani apan kartavya karun shant rahna ani swatahch swatahla sangna ki he ahe te karma mhnun kelay ani sodun dena hech mahatvacha.. sobatach te denyachi maryada dekhil asavi karan ti gosta apan mehnatine kamavli aste ani Tyachi kimmat asavi
सुंदर निरीक्षण.
फायदा-तोट्याच्या चौकटीत देवाण-घेवाण होत असते हे वास्तव आहेच.
पण कर्तव्यभाव आणि मर्यादा यांचा समतोल साधला की देण्याची कृती अधिक अर्थपूर्ण बनते.
आणि हो, मेहनतीने कमावलेल्या गोष्टींना योग्य मूल्य असणे तितकेच महत्त्वाचे आहे.
Very sensitive and delicate topic,very well and Nicely articulated.
Regards
Thanks a lot dear for taking time to appreciate
Eye opener
Thanks dear
I dont know how this happened. But i was feeling the same and trying to figure out a way to get out of this sutuiation. After reading your blog i realized that the path i have adopted is the same you are suggesting. Thank you for this insight.
QQ. What if we are already being generous and now we want to charge for it ? What should the next person feel about, me asking to get paid for the things which i were providing for free previously ?
Something that you are great at should not be given free of cost. If you do then the person getting favour stop appreciating or never appreciates and you will start feeling miserable in the process.
सर नमस्कार
आज पर्यंत आलेला अनुभव माझ्या साठी कटु अनुभव होता….पण पर्याय सापडत नव्हता.
आज तुम्ही खूप सहजपणे सदरचे कोडं उलगडुन छान पद्धतीने मांडणी केली…. आणि माझी होणारी कोंडी आता पुन्हा होणार नाही.
धन्यवाद सर.
खूप वेळा आपण अशा कटू अनुभवातून जात असतो आणि कधी आपण त्या चक्रव्युहात अडकून पडतो तर कधी ती कोंडी फोडून बाहेर पडतो. आणि ते फक्त बाहेर पडणे नसते तर आयुष्याचा एक नवीन धडा आपण त्यावेळी गिरवलेला असतो.
मी देखील त्याला अपवाद नाही आहे. मी जे अनुभवले त्याच भावना मी शब्दात मांडल्या आहेत आणि मला आनंद आहे की ते तुमच्या कामी आले.
आणि हो, पुन्हा अशी परिस्तिथी येणारच नाही अशातला भाग नाही आहे पण जर का तुम्ही सजगता बाळगून सीमारेषा आखल्यात तर त्या कोंडीत अडकण्यापुर्वीच स्वतःची सुटका करून घ्याल एवढे मात्र निश्चित.